सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२

मी आयफोन-कर


तुम्हाला कोण व्हायचे आहे आयफोन-कर, एनड्रोइड-कर कि विंडोज-कर 


... आता तुम्हाला आयफोन-कर व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही. पण मुख्य सल्ला असा, की पुन्हा विचार करा अगदी आग्रहच असेल, तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे, आणि एकदा तयारी झाली, की त्या सारखी मजा नाही ,तुम्हाला सांगतो.
पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक फोन च्या फिचर वरून मतभेद करायला शिका. म्हणजे आपल्या फोन मध्ये आहे का, आपल्या फोनमधील फिचरचा  दर्जा काय, एकूण उपयोग काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. म्हणजे आता "स्मार्ट-फोन खरा कसा असला पाहिजे?" या विषयावरती, आपण फ़क़्त फोन करणे, लघु संदेश करणे इतकाच फोन वापरता, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे.  स्मार्ट-फोन खरा कसा असला पाहिजे? - ठोका.
दिवसातून एकदा तरी "स्टीव जॉब्स होता तेव्हा ..." हे म्हणायलाच पाहिजे. हे वाक्य म्हणायला वयाची अट नाही. इथे म्हणजे दहा वर्षाचा मुलगा सुद्धा चाळीशीच्या अनुभवाचे गाठोडं असल्यासारखं ते चारचौघांपुढे उघडत असतो. त्यामुळे "च्यायला, स्टीव जॉब्सच्या वेळी हे असलं नव्हतं" हे वाक्य कॉलेज, ऑफिस, दुर्गा, के एफ सी, सी सी डी,  आणि युरो किड्स, कुठेही ऐकायला मिळेल, "स्टीव जॉब्सच्या वेळी ते तस नव्हतं!"
आयफोन-कर व्हायला कसल्यातरी गोष्टीचा जाज्ज्वल्य अभिमान हवा- नुसता नाही, जाज्ज्वल्य अभिमान. मग तो अगदी स्टीव्ह जॉब्स चा, किंवा एपल चाच असला पाहिजे असे काही नाही. म्हणजे आपण आयफोन किती महाग घेतला, किती वेळ रांगेत उभे होतो, सीम कार्ड कसे कट केले ह्या पर्यंत कुठल्याही गोष्टीचा असला तरी चालेल. पण जाज्ज्वल्य अभिमान हवा. मतभेद व्यक्त करायला या जाज्ज्वल्य अभिमानाची फार मदत होते. म्हणजे ब्लू-टूथ किवा डाऊनलोडच्या ऐवजी, आय-ट्युन्स मधून उगाच गाणी विकत घेणे, वायरलेस सिन्क सतत करणे, एस डी कार्ड च्या ऐवजी आय-क्लाऊड वर गोष्टी ठेवणे - अशी त्या त्या अभिमानाची नीट वाटणी करता येते आपल्याला. आपला मतभेद केवळ खासगी मध्ये व्यक्त करून आयफोन-कर थांबत नाहीत. अधून मधून फेसबुक वर, आपल्या ब्लोग वर आयफोन बद्दल स्तुती लिहावी लागते इतर ओ एस चा अपमान करावा लागतो. इमेल ला मुद्दाम "सेंट फ्रॉम आयफोन !" अशी स्वाक्षरी द्यावी लागते. त्यासाठी लेखनाची स्वातंत्र्य शैली कमवायची, हे अत्त्यंत आवश्यक आहे.

थोडक्यात म्हणजे आयफोन-कर व्हायचं असेल, तर म्हातारपणा पर्यंत सगळे सोफ्टवेअर आणि अभिमान विकत घेऊन वापरणाच्या दिशेने वाटचाल करायच धोरण सांभाळावे लागते.

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१२

सेतु : मी (अनुवाद)



सेतु : मी (अनुवाद)
=====


खोल घाटांतून ...

उंच शिखरांकडे 
ज्याला जायचे होते तो तर गेला -
हाय माझ्या शिरी पाय रोवून 
माझ्याच बहुपाशातून ...
इतिहास तुला घेऊन गेला 

ऐक कान्हा, ऐक 

का मी फ़क़्त एक सेतू होते तुझ्यासाठी 
लीलाभूमी आणि युद्धभूमी मधील  
दुस्तर काळ जोडण्यापुरती!

आता या सुन्या शिखारांत, मृत्यू-घाटात 

सोन्याच्या पातळ तारांनी गुंफलेल्या पुलासारखे 
निर्जन 
निरर्थक 
कंपणारे, विसरलेले, उरलेले माझे हे सेतू-शरीर 

ज्याला जायचे होते तो तर गेला


- धर्मवीर भारती (स्वैर अनुवाद - विश्वेश)


मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२

शब्द - अर्थहीन (अनुवाद)



प्रसंग - राधा कृष्णाला जाब विचारते कि तू मला का सोडून गेलास, त्यावर कृष्ण तिला बरेच समजावू पाहतो, कर्म, धर्माच्या गोष्टी सांगतो 

त्यावर राधाचे उत्तर -


शब्द - अर्थहीन 

==========



हि सार्थकता तू 

मला कशी समजावणार ...

कान्हा ...


शब्द शब्द शब्द 

माझ्या करता सगळे अर्थहीन असते,

जर ते माझ्या समीप बसून 

माझ्या निर्जीव कुंतलात हात गुंफून 

तुझ्या कापऱ्या ओठांतून आले नसते ...

शब्द शब्द शब्द 


कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व ....

मी देखील घरो घरी ऐकले आहेत हे शब्द 

अर्जुनास यात काहीही सापडो ...

मला बापडीला यात काही सापडत नाही प्रिया ...

मी फ़क़्त त्यांच्या मार्गात अडखळून 

तुझ्या ओठांची कल्पना करत राहते,

ज्यातून तू पहिल्यांदा उच्चारले असशील हे शब्द ...


तुझे ते सावळे मनोहर रूप 

किंचित वळलेली शंखाकृती मान 

माझ्या दिशेने उठलेल्या चंदन-बाहू 

ती आपल्यातच मग्न अशी दृष्टी 

अन हळू हळू हलणारे ते ओठ ...


मी कल्पना करते कि 

अर्जुनाच्या जागी मी आहे 

आणि माझ्या मनात मोह निर्माण झाला आहे 

मला माहिती नाही कि हे कोणते युद्ध आहे 

मी कोणाच्या बाजूने आहे 

नेमका पेच काय आहे 

आणि युद्धाचे कारण काय आहे

पण माझ्या मनात मोह निर्माण झाला आहे 

कारण तुझ्याकडून समजावून घेणे 

मला फार आवडते 

आणि सैन्य स्तब्ध उभे आहे 

इतिहास स्थगित झाला आहे 

आणि तू मला समजावत आहेस ...


कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व ....

शब्द शब्द शब्द 

माझ्या करता नितांत अर्थहीन आहेत हे -

मी ह्या सगळ्याच्या पलीकडे तुला पाहते आहे 

तुझ्या प्रत्येक शब्दाला

चातकासारखी पीत आहे 

आणि तुझे असाधारण तेज 

माझ्या शरीरातील रोमा रोमास 

सचेतन करीत आहे   


आणि तुझ्या ह्या जादूभर्या ओठांतून 

रातराणीच्या फुलासामान टप-टप शब्द झरत आहेत 

एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक ....

कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व ....

आणि माझ्यापर्यंत येता-येता सगळे बदलून जात आहेत

मला ऐकु येते ते फक्त ...

राधे राधे राधे ...


शब्द शब्द शब्द 

तुझे शब्द अगणित आहेत कान्हा - अमाप 

पण त्यांचा अर्थ एकाच आहे -

मी

मी

फ़क़्त मी


मग आता त्या शब्दांनी 

मलाच 

इतिहास कसा समजावणार कान्हा ?


- धर्मवीर भारती (स्वैर अनुवाद - विश्वेश)



मूळ कविता -
---------------

कनुप्रिया (इतिहास: शब्द – अर्थहीन) 

पर इस सार्थकता को तुम मुझे
कैसे समझाओगे कनु?
शब्द, शब्द, शब्द…….
मेरे लिए सब अर्थहीन हैं
यदि वे मेरे पास बैठकर
मेरे रूखे कुन्तलों में उँगलियाँ उलझाए हुए
तुम्हारे काँपते अधरों से नहीं निकलते
शब्द, शब्द, शब्द…….
कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व……..
मैंने भी गली-गली सुने हैं ये शब्द
अर्जुन ने चाहे इनमें कुछ भी पाया हो
मैं इन्हें सुनकर कुछ भी नहीं पाती प्रिय,
सिर्फ राह में ठिठक कर
तुम्हारे उन अधरों की कल्पना करती हूँ
जिनसे तुमने ये शब्द पहली बार कहे होंगे
- तुम्हारा साँवरा लहराता हुआ जिस्म
तुम्हारी किंचित मुड़ी हुई शंख-ग्रीवा
तुम्हारी उठी हुई चंदन-बाँहें
तुम्हारी अपने में डूबी हुई
अधखुली दृष्टि
धीरे-धीरे हिलते हुए होठ!
मैं कल्पना करती हूँ कि
अर्जुन की जगह मैं हूँ
और मेरे मन में मोह उत्पन्न हो गया है
और मैं नहीं जानती कि युद्ध कौन-सा है
और मैं किसके पक्ष में हूँ
और समस्या क्या है
और लड़ाई किस बात की है
लेकिन मेरे मन में मोह उत्पन्न हो गया है
क्योंकि तुम्हारे द्वारा समझाया जाना
मुझे बहुत अच्छा लगता है
और सेनाएँ स्तब्ध खड़ी हैं
और इतिहास स्थगित हो गया है
और तुम मुझे समझा रहे हो……
कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व,
शब्द, शब्द, शब्द…….
मेरे लिए नितान्त अर्थहीन हैं-
मैं इन सबके परे अपलक तुम्हें देख रही हूँ
हर शब्द को अँजुरी बनाकर
बूँद-बूँद तुम्हें पी रही हूँ
और तुम्हारा तेज
मेरे जिस्म के एक-एक मूर्छित संवेदन को
धधका रहा है
और तुम्हारे जादू भरे होठों से
रजनीगन्धा के फूलों की तरह टप्-टप् शब्द झर रहे हैं
एक के बाद एक के बाद एक……
कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व……..
मुझ तक आते-आते सब बदल गए हैं
मुझे सुन पड़ता है केवल
राधन्, राधन्, राधन्,
शब्द, शब्द, शब्द,
तुम्हारे शब्द अगणित हैं कनु -संख्यातीत
पर उनका अर्थ मात्र एक है -
मैं,
मैं,
केवल मैं!
फिर उन शब्दों से
मुझी को
इतिहास कैसे समझाओगे कनु?

शुक्रवार, ६ जुलै, २०१२

पुन्हा पाऊस


ढग दाटता ... मन फाटता ...
पाऊस साठता ... फुटला टाहो ...
पुन्हा कोरड्यात ... मला न्याहो ...
पुन्हा कोरड्यात ... मला न्याहो ...

ह्या ओळी सुचल्या आणि त्या नंतर हि कविता झाली ...

पुन्हा पाऊस
========

आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
 
चांगली उन्हाची सवय झाली होती ...
तो डबडबणारा घाम
ते काळवंडलेले शरीर
तो कोरडेपणा ... ती रखरख 
यांना चांगली लय आली होती ...
कुठून हे काळे ढग आले ... आता सगळ बेताल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...

आता पुन्हा तो ओलावा 
पुन्हा तो हिरवेपणा 
पुन्हा त्या कोरड्या डोंगरावर 
उमटणार झर्यांच्या रेघा ...
बुजणार पुन्हा ...
पडलेल्या त्या सगळ्या भेगा ...
पुन्हा नव्या आशेनी ... आता मन चल बिचल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...

पुन्हा एकट्याने भिजायचे 
पुन्हा एकटेच वाळायचे ...
असेच नित्य नियमाने 
स्वताला ओलेत्यानी जाळायचे ...
मग पावसाच्या पाण्यातूनच 
हळूच डोळ्यातून रक्त ... गाळायचे ...
आता फ़क़्त पाणीच नाही ... तर रक्त पण गढूळ होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...

या वर्षी ... 
पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...

- विश्वेश 

मंगळवार, ३ जुलै, २०१२

पाऊस


  पाऊस
======

पाऊस आला कि नेहमी आठवयाचीस तू ...
पावसाचे थेंब ओंजळीत साठवायाचीस तू ...
अन बेसावध एखाद्या क्षणी त्या ओंजळीत भिजवायाचीस तू ...

आता इतका सावध झालो ... 
कि उगाच कधीच भिजत नाही ...
कितीही आभाळ काळवंडले 
तरीहि मन तिथे थिजत नाही ...

आता पाऊस आला कि येते चीड ...
त्या गर्दीची ... त्या ट्राफिक ची ...
त्या चिखलाची ... त्या मातीची ...
त्या पाण्यात उड्या मारणाऱ्या पोराची ...
त्या रेडीओ वरच्या लताची ...

आणि सगळ्यात जास्त ... स्वताची ...

आता इतका सावध झालो ... 
कि मनातल्या त्या कोपर्यातली तू ...
बेसावध क्षणी भिजवशील ...

या भीतीने ... उगाच तिथे थिजत नाही ...

मी पावसाच्या आणि पाऊस माझ्या 
वाटेला आता जात नाही ....

- विश्वेश 

बुधवार, २७ जून, २०१२

आज कितीक दिवसांनी ...

आज कितीक  दिवसांनी ... 
तुझा तो सवयीचा स्पर्श ... 
अंग शहारून गेला ...
तुझा तो सवयीचा वास ...
मन सुगंधून गेला ...

आज कितीक दिवसांनी ...
तुझ्या नेहमीच्याच मोकळ्या केसात 
पुन्हा हरवले हात ..
तुझ्या नेहमीच्याच  लकबिंनी  
पुन्हा हलवले खोल आत  ... 

आज कितीक दिवसांनी ...
माझ्या कवितेला सापडलीस तू 
अन  तुला सापडली माझी कविता 

आज कितीक दिवसांनी ...
चाकोरीचा तोडून बांध 
भरून वाहिली भावनांची सरिता ...

आज कितीक दिवसांनी ...
पुन्हा तू ... तीच तू ...
अन पुन्हा मी ... नवा मी ...

- विश्वेश