मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

बेत

कविवर्य सुरेश भटांच्या ह्या ओळींवरून प्रेरणा मिळाली -


मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते...
नकळत आयुष्य मात्र वेगळीच वाट चालत होते
सापडला किनारा म्हणून जरा विसावलो ...
तर ते मृगजळ मला पाहून हसत होते

भेदरलो शोधू लागलो परतीची वाट
चाचपून पहिला आधारासाठी धरलेला हात
तो हात बहुदा कधीच सुटला
अन एकाकीपणाच्या नुसत्या जाणीवेने काळजाचा ठोका चुकला ...

घातली साद त्या दिलाबरास पुन्हा पुन्हा
उमगले नाही काय घडला गुन्हा ...
वाटले संपवावे हे जीवनाचे समर तितक्यात ....
दूरच्या मशिदीत घुमले अल्लाहू अकबर